
श्री. दीपक शिवानंद पाण्डेय्
भा.पो.से
अपर पोलीस महासंचालक व संचालक,
पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन,
महाराष्ट्र राज्य, पुणे.
पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग राज्यातील पोलीसांना कायदा व सुव्यवस्था राखणेकामी प्रभावी संवाद आणि समन्वय सुनिश्चित करून रीअल-टाइम कम्युनिकेशन ज्यात कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये तात्काळ संपर्क साधणे आणि मदत आवश्यक असलेल्या घटनांना वेळेवर प्रतिसाद देणे सहज शक्य होते; परिस्थितीविषयक जागरूकता राखणेकरिता पोलीस अधिका-यांना घडामोडीची अद्यायावत माहिती प्रदान करून त्यांची निर्णय घेण्याची क्षमता वाढवण्यास मदत होते; आपत्कालीन परिस्थितीत जलद समन्वय प्रतिसाद सक्षम करून संसाधनांच्या जलद उपयोजना केली जाते; डेटा ट्रान्समिशनमध्ये गोपनीय माहितीची सुरक्षित देवाणघेवाण करून कायदा व सुव्यवस्था राखली जाते परिणामी माहितीच्या आधारे पुढील तपासास मदत होते ; सुरक्षितता आणि सुरक्षा दृष्टीकोनातून संवेदनशील माहितीकरिता दळणवळण वाहिनी उपलब्ध करून दिली जाते.
10 डिसेंबर 1967 रोजी महाराष्ट्रात 6.3 रिश्टर स्केलचा कोयना भूकंप व 30 सेप्टेंबर 1993 रोजी 6.04 रिश्टर स्केलचा किल्लारी भूकंप झाला होता. इमारती आणि पायाभूत सुविधांच्या पडझडीमुळे लक्षणीय आर्थिक नुकसान आणि जीवितहानी झाली होती. तसेच 26 जुलै 2005 रोजी मुंबईत आलेला पूर विनाशकारी होता. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पूर आला, वाहतुकीवर परिणाम झाला, हजारो लोक विस्थापित झाले आणि असंख्य मृत्यू झाले. या आपत्तीदरम्यान शहराला आपत्कालीन प्रतिसाद आणि पायाभूत सुविधांना आव्हानांचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे मुंबईतील 26/11 चा दहशतवादी हल्ला, दंगली आणि बॉम्बस्फोट असे प्रसंग उद्भवले होते. अशा प्रसंगी प्रसार माध्यमे, मोबाईल नेटवर्क यांसारखे खाजगी नेटवर्क अयशस्वी झाल्याने राज्याने खूप अडचणींचा सामना केला होता, दरम्यान या महत्त्वपूर्ण घटनांमध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि प्रतिसादामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीसांचा बिनतारी संदेश विभाग यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे.
